निवडणुका अगदी धुमधडाक्यात झाल्या. निकालही अगदी अनपेक्षितरित्या अपेक्षित लागले. आणि कोण मुख्यमंत्री होणार यासाठी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडेही लागल्या.. सगळीकडे आनंदी आनंद झाला.
हे सर्व सुरू असतानाच.. निकालांच्या दुसऱ्याचं दिवशी ठाण्यात एवढा मोठा गर्डर गाडीवर कोसळला, २ ठार झाले १२ जखमी झाले. मुंबईची जीवनवाहिनी जवळपास दिवसभर बंद झाली...
काय झालं... नाक चेपलेल्या गाडीपुढे अनेक बघे जमले.. आम्ही मिडीयावाले कॅमेरा घेऊन धावलो... गाडीसमोर उभे राहून बडबड केली... आमच्या चॅनलसमोर असंख्य बघे बसले.. त्यातच काही नवनिर्वाचित माननीय आमदार त्या गर्दीत आले. त्यांनी बाईट्स दिले... रेल्वेकडे आम्ही मेगाब्लॉक मागितला तो त्यांनी दिला नाही अशी रेल्वेवर आगपाखड झाली. रेल्वेनेही हात झटकले... कंत्राटदारावर कारवाई करून प्रकरण दाबायचा प्रयत्न सुरू झाला..

ठाण्यासारख्या अवाढव्य स्टेशनावर रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा तय़ार नव्हती.. रेस्क्यू व्हॅन यायला दीड तास लागला... ठाणे फायरब्रिगेडकडे गॅसकटन नव्हता.. तो जवळच्या वेल्डींगवाल्याकडून आणावा लागला. आत माणूस अडकला आहे हे दिसत असतानाही आम्ही गॅसकटर वापरला.. अजून इतर कुठलाही कटर आमच्या कडे नव्हता.. ठिणग्या आतल्या माणसावर पडल्या.. तो मरता मरता अनेक चटके खाऊन गेला. तो मरायच्या आधी त्याचा हातही कोपरापासून काढावा लागला.. तो गेला.. गर्डर पडतोय हे लक्षात आल्यावर त्याने इमर्जन्सी ब्रेकही दाबला होता. गर्डर त्याच्या केबिनवर पडला. त्याच्या प्रसंगावधानामुळे तो मागच्या डब्यावर आला नाही... सर्वसामान्य मुंबईकर पुन्हा पुन्हा हे आठवणार.. तो आपल्या गाडीचा कितीवेळा मोटरमन असेल, त्याने कित्येकवेळा आपल्याला ऑफिसला नेलं असेल, घरी सोडलं असेल हे आठवून अंगावर शहारे येतील. ते शहारे गर्दीत थोड्याच वेळात विरून जातील. रेल्वेची बेपर्वाई, ठाणे महानगरपालिकेची बेपर्वाई आम्ही विसरून जाऊ...
निवडणुका अगदी धुमधडाक्यात झाल्या. निकालही अगदी अनपेक्षितरित्या अपेक्षित लागले. आणि कोण मुख्यमंत्री होणार यासाठी सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडेही लागल्या.. सगळीकडे आनंदी आनंद झाला.